मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची पाकिस्तानात सुरू असलेली सुनावणी बुधवारी १७ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. वकिलांनी संप पुकारल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे.
रावळपिंडी बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ वकिलांनी संप पुकारल्याने बुधवारी या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या खटल्याची दहशतवादविरोधी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती रजेवर असल्याने गेल्या दोन वेळची सुनावणीही होऊ शकली नव्हती.