पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या मुंबई आणि दिल्लीस्थित कार्यालयांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या प्रवक्त्याने दिली. दरम्यान, पाकिस्तान एअरलाईन्सच्या कार्यालयांना आवश्यक सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासन परराष्ट्र कार्यालयाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना दिले आहे.
हल्ल्याची धमकी आल्यानंतर भारत सरकारकडे पाकिस्तान एअरलाईन्सच्या मुबई आणि दिल्लीस्थित कार्यालयांना आवश्यक सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे, असे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले. दोन्ही देशांतील हवाई संपर्क तोडण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.