तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याची मागणी करत मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समितीचे गठन करून जयललिता यांच्या मृत्यू मागचे रहस्य शोधण्याची मागणी केली आहे.

ही जनहित याचिका एआयडीएमकेचे सदस्य पी. ए. जोसेफ यांनी दाखल केली आहे. त्यांनी २२ सप्टेंबर २०१६ रोजी जयललिता यांना अपोलो रूग्णालया दाखल केल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या सर्व घटनांचा तपशील दिला आहे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत लोकांना शंका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या जनहित याचिकेत १२ लोकांना उत्तरदायित्व ठरवलेले आहे. यामध्ये अपोलो रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रताप. सी. रेड्डी यांचाही समावेश आहे. या १२ लोकांचे नाव घेत सर्व नोंदी, अहवाल आणि सरकारी रूग्णालयांकडे जमा असलेल्या दस्ताऐवजांच्या चौकशीची मागणी करत अचानक रूग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयासारख्या गोष्टींवर उत्तर मागण्यात आले आहे.
या याचिकेनुसार या आयोगात किमान तीन निवृत्त न्यायाधीशांची मागणी करण्यात आली आहे. त्यांना निवडणुकीशी निगडीत अर्जांवर जयललिता यांच्या अंगठ्याच्या निशाणीचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत हे सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत त्यात बदल केली जाण्याची जास्त शक्यता असल्याचे याचिकेत म्हटले आहे.