लहान मुलांनी आपल्या आजी आणि आजोबांची मुलाखत मोबाइलवर घ्यावी. त्यांना विविध प्रश्न विचारावेत असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ दरम्यान केलं. आज सकाळी ११ वाजता त्यांनी देशाशी रेडिओवरुन संवाद साधला. या संवादात त्यांनी देशभरातल्या लहान मुलांना हे आवाहन केलं आहे. रिपोर्टर ज्याप्रमाणे मुलाखत घेतो ते तुम्ही पाहिलं असेल अगदी तशाच प्रकारे आपल्या आजी आजोबांची मुलाखत घ्या. तुमच्यासाठी तो आठवणींचा एक ठेवा असेल असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यासाठीचे काही प्रश्नही मोदींनी सुचवले आहेत.

मोदींनी लहान मुलांना सुचवले हे प्रश्न

D Y Chandrachud News in Marathi
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या ‘या’ कृतीवर व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जे खटले १० महिन्यांपेक्षा जास्त…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा
  • आपल्या आजी-आजोबांना विचारा की तुम्ही तुमचं लहानपण कसं घालवलंत?
  • तुम्ही तुमच्या लहानपणी कोणते खेळ खेळत होतात?
  • तुम्ही तुमच्या लहानपणी सण आणि उत्सव कशा प्रकारे साजरे करत होतात?
  • तुम्ही जर शेतावर जात असाल तर तिथे काय धमाल करायचात?
  • तुम्हाला तुमचे आई-वडील कोणत्या गोष्टी सांगायचे?

हे आणि असे काही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांना सुचवले आहेत. लहान मुलांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करावा जेणेकरुन एक आठवणींचा ठेवा त्यांच्याजवळ राहिल. तर जी बुजुर्ग मंडळी आहेत त्यांनाही आपला भूतकाळ आठवून आनंद होईल. तसंच आपण जपलेला ठेवा ते पुढच्या पिढीला देऊ शकतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातद्वारे देशाशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी चीन, करोना, लॉकडाउन यांसारख्या विषयांवरही भाष्य केलं. भारताकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना लष्कराने करारा जवाब दिला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तर आपल्या देशात गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक संकटं आली, तरीही आपण सगळे डगमगून न जाता संकटांचा सामना करतो आहोत. हे वर्ष वाईट नाही आणखी कितीही संकटं आली तरीही आपण त्यांचा मुकाबला करु शकतो असाही आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.