छत्तीसगढचे आरोग्यमंत्री अमर अग्रवाल यांच्या जिल्ह्य़ात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान १३ महिला दगावल्या. या घटनेची जबाबदारी सरकारने स्वीकारण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यांनी शनिवारी  पीडित महिलांची भेट घेतली. जनतेला चांगली आरोग्यसेवा देणे ही जनतेची जबाबदारी आहे. मात्र  सरकार जबाबदारीपासून पळ काढत असल्याचे आल्याची टीका राहुल यांनी केली. या घटनेनंतर औषधे जाळून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पुरावे नाहीसे करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप केला.