वंचित घटकांची जेव्हा गळचेपी केली जाईल तेव्हा त्यांच्या हक्कांसाठी आपण आयुष्य समर्पित करण्यास तयार आहोत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीतील सफाई कामगारांना आश्वस्त केले. आपण केवळ सफाई कामगारांबाबतच भाष्य करीत नाही, तर जेव्हा गरीब जनतेची गळचेपी होईल तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू. सूट-बूट सरकार असो किंवा आप असो, त्यांनी त्यांच्या कामात कसूर केली तर वंचितांच्या पाठीशी आपण उभे राहू, असेही राहुल गांधी म्हणाले.