काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिलाबाद जिल्ह्य़ात १५ किमी पदयात्रा काढणार आहेत.
यापूर्वी राहुल यांनी पंजाब आणि विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. आंध्र प्रदेशमधून २ जून रोजी तेलंगण वेगळे राज्य केल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच तेलंगण दौरा आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची राहुल भेट घेतील. पदयात्रेच्या समारोपा वेळी कोर्टिकल येथील गावात त्यांचे भाषण होईल.