दोन दिवसांच्या स्वच्छ हवामानानंतर राज्यात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरण कुंद झाले. खोऱ्याच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कोठेही हिमवृष्टी झाली नाही. पावसाळी हवेमुळे तापमानात लक्षणीय फरक पडला. श्रीनगरमधील कमाल तापमान १६.३ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले.