दिल्लीतील रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून ३० ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जायचे. त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले. आता या ऐतिहासिक मैदानाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महानगर पालिकेने तयार केला आहे. महापौर आदेश गुप्ता म्हणाले, अटल बिहारी वाजपेयींनी या मैदानात अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या मैदानाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ३० ऑगस्ट रोजी महासभा होणार असून या महासभेत नामकरणाचा प्रस्ताव मांडला जाईल. सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर मैदानाच्या नामकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

BJP agenda is polarisation K C Venugopal Congress Loksabha Election 2024
“ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
Rahul Kaswan Congress candidate attacks BJP
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल
history of ramleela maidan
रामलीला मैदान- जयप्रकाश नारायण यांचे इंदिरा गांधींविरोधात आंदोलन ते आप पक्षाच्या स्थापनेचे केंद्र
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

रामलीला मैदान हे असंख्य राजकीय घटनांचे साक्षीदार आहे. २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आले होते. अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा याच मैदानात पार पडला होता. २०१५ मध्ये केजरीवाल हे पुन्हा सत्तेत आले आणि त्यावेळी देखील केजरीवाल सरकारचा शपथविधी सोहळा याच मैदानावर पार पडला.

२०११ मध्ये योगगुरु रामदेव बाबा यांचे भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लोकपालसाठीचे आंदोलनही याच मैदानात झाले होते. १९५२ मध्ये भारतीय जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू- काश्मीरच्या मुद्द्यावरुन याच मैदानात सत्याग्रह केले होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील १९५६- ५७ मध्ये याच मैदानात ऐतिहासिक सभा घेतल्या होत्या. जयप्रकाश नारायण यांनी देखील याच मैदानातून तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकले होते. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. त्याच दिवशी रामलीला मैदानात जयप्रकाश नारायण आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील रॅली घेतली होती.