पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भारतासमोर लोटांगण घालणारी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली आहे. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात असं सांगत खान यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला. पाकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. पुलवामामध्ये भारतीय लष्कराचे ४१ जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यानंतर भारतानं तेराव्या दिवशी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत जैश ए मोहम्मदच्या ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती ओढवली असून भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. Pakistan PM Imran Khan: All wars in world history have been miscalculated, those who started the wars did not know where it will end. So, I want to ask India, with the weapons you and we have, can we afford miscalculation? pic.twitter.com/3wnmLYq39P — ANI (@ANI) February 27, 2019 पुलवामा प्रकरणाची चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत इम्रान खान यांनी एकप्रकारे भारतासमोर नांगी टाकल्याचे दिसत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्ताननं थारा देऊ नये असं सांगत अमेरिका व चीननंही भारताच्या बाजुनं मत व्यक्त केल्यामुळे पाकिस्तानला उपरती झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य वरवरचे आहे की त्यात सत्याचा अंश आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. Pakistan Prime Minister Imran Khan: If a war takes place, it will not be in my or Narendra Modi's control. If you want any kind of talks on terrorism, we are ready. Better sense must prevail. We should sit down & talk pic.twitter.com/XydmNgLYYC — ANI (@ANI) February 27, 2019 भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर सीमारेषेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्यांनी तो हाणून पाडला. परिस्थिती तणावपूर्ण असून भारत आणि पाकिस्तानमधील महत्त्वाची विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत. मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले. भारतीय हवाई दलाचा वैमानिक पाकमध्ये बेपत्ता: परराष्ट्र मंत्रालय पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले असून या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं असून या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचंही रवीश कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या वैमानिकाचं नाव अभिनंदन वर्थमान असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. सदर व्हिडीयोची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.