अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान राम मंदिर उभारलं जात असताना जमिनीत दोन हजार फूट खाली ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “राम मंदिरं उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी ५ ऑगस्ट रोजी जमिनीखाली टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका”. All reports about placing of a time capsule under the ground at Ram Temple construction site on 5th August are false. Do not believe in any such rumour: Champat Rai, General Secretary, Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust pic.twitter.com/HQ4CkZ9Ob9 — ANI (@ANI) July 28, 2020 आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातूनच पाहता येणार महत्त्वाचं म्हणजे याआधी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनीच टाइम कॅप्सूल ठेवलं जाणार असल्याची माहिती दिली होती. “राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्यं सापडतील,” असं त्यांनी म्हटलं होतं. आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजन : ८०० किलोमीटरचा प्रवास करुन मुस्लीम भाविक राहणार सोहळ्याला उपस्थित A time capsule will be placed about 2000 ft down in ground at Ram Temple construction site. So, that in future anyone who wishes to study about history of the temple, he'll only get facts related to Ram Janmabhoomi: Kameshwar Chaupal, Member, Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust pic.twitter.com/4qZRnmCA0K — ANI (@ANI) July 26, 2020 आणखी वाचा- पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील : ओवेसी टाइम कॅप्सूल म्हणजे काय ? वर्तमानकालीन महत्वाच्या घटनांची नोंद असलेले कागदपत्र व इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्यांना उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी हा त्यामागील हेतू असतो ५ ऑगस्ट रोजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष तयारी सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. तसेच, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.