राष्ट्रविरोधी शक्ती देशातील शांतता आणि सद्गुणांना नष्ट करण्याच्या दिशेने काम करत असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. ७० व्या प्रजासत्ताक दिवसानिमित्त उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.
Mohan Bhagwat, RSS: 70 saal hue, hum aage badh rahe hain. Lekin dunia mein shanti uttpan hui to jinke swarth ke dukaan band honge, aise log prayaas kar rahe hain ki desh samriddh na ho. Iss prakar ke prayas karne wali shaktian dunia mein hain, apne desh mein bhi hain. (26.01.19) pic.twitter.com/CHVW0JKKB8
— ANI (@ANI) January 27, 2019
ते म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाले आहेत. आपण पुढे जात आहोत. पण काही शक्ती अशा आहेत की, त्यांना शांतता आणि सद्गुण उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात सध्या अशा पद्धतीच्याच शक्ती आहेत.
७० वर्षे झाले, आपण पुढे जात आहोत. पण जगात जर शांतता निर्माण झाली तर त्यांचे स्वार्थी दुकान बंद होईल. देश समृद्ध होऊ नये म्हणून असे लोक प्रयत्न करत आहेत. असा प्रयत्न करणाऱ्याच शक्ती जगात, आपल्या देशात कार्यरत आहेत.
केवळ भारताकडेच या राष्ट्रविरोधी शक्तींचा सामना करण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची क्षमता आहे. संपूर्ण जगाला याबाबत माहीत आहे आणि तेही पीडित आहेत. पण केवळ भारताकडेच अशा शक्तींना पराभूत करण्याची क्षमता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 7:32 pm