अभिनेता सलमान खान याची २००२ मधील हीट-अ‍ॅण्ड- रन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला बळींच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने या खटल्यास आता वेगळेच वळण लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारी रोजी या खटल्याची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी घेण्याचे मुक्रर केले होते. महाराष्ट्र सरकारने केलेल्या याचिकेवर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. हीट-अ‍ॅण्ड-रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पत्नीने सलमानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आव्हान दिल्याने याचिकेचे महत्त्व आणखी वाढले आहे. आपला बचाव करण्यासाठी सलमान खान याने कपिल सिब्बल यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.