माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप शुक्रवारी देण्यात आला. त्यांच्या जाण्याने देश हळहळला. अशात बिहारच्या महात्मा गांधी विद्यापीठातील प्राध्यापक संजय कुमार यांनी फेसबुकवर अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. ज्यामुळे त्यांच्यावर जमावाने हल्ला केला ज्यामध्ये झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक संजय कुमार हे जेव्हा शुक्रवारी त्यांच्या घरी काम करत होते त्यावेळी त्यांच्यावर पाच जणांनी हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली. Bihar: Sanjay Kumar, a Professor at the Mahatma Gandhi Central University in Motihari, thrashed by a mob yesterday allegedly for sharing an FB post critical of #AtalBihariVajpayee. Says 'Some elements have been targeting me for speaking against the VC and this was another excuse' pic.twitter.com/6hMpM9d8gq — ANI (@ANI) August 18, 2018 माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरु अरविंद अग्रवाल यांचा हात आहे असा आरोप प्राध्यापक संजय कुमार यांनी केला आहे. फेसबुकवर पोस्ट करताना मी अटलजींना 'संघी' आणि 'फॅसिस्ट' म्हटले. मी माझे मत मांडले मला वाटत नाही यात काही गैर आहे. मात्र अरविंद अग्रवाल यांनी काही तरूणांची माथी भडकवली आणि माझ्यावर हल्ला करण्यास पाठवले असा आरोप संजय कुमार यांनी केला. दरम्यान प्राध्यापक संजय कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरूणांचा निषेध करत राजदच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयासमोरच्या रस्त्यावर भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. महात्मा गांधी विद्यापीठ हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यामुळेच मारहाण झालेल्या प्राध्यापकांची तक्रार पोलिसात नोंदवून घेतली जात नाही असाही आरोप राजदचे नेते मणिभूषण यांनी केला.