शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय जनता पार्टीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करताना गोहत्याबंदीप्रमाणे थापा बंदी केली पाहिजे असं सांगत भाजपाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. मतदारांनी एकदा चूक केली, मात्र ते ती चूक परत करणार नाहीत असं म्हणत पुढील निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना खरोखर स्वबळावर लढेल का? आधी वेगळी चूल मांडून, प्रयोग फसला तर परत भाजपाशी युती करेल का? अशा निवडक प्रश्नांवर द्या तुमचं मत… सहभागी व्हा लोकसत्ता ऑनलाइनच्या या पोलमध्ये…