दिल्लीतील दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद तसेच माहितीपट निर्माते राहुल रॉय यांची नावं दंगलीचा कट रचणाऱ्यांमध्ये समाविष्ट केली आहेत. यावरून सीताराम येचुरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा मोदी व भाजपाचा खरा चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “ ५६ लोकं दिल्लीतील हिंसाचारात मारली गेली. भडकाऊ भाषणांचा व्हिडिओ आहे, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? कारण सरकारने आदेश दिला आहे की कोणत्याही प्रकारे विरोधकांना गुंडाळलं जावं, हाच मोदी व भाजपाचा खरा चेहरा, नीती व विचार आहे. याचा विरोध तर होईलचं.” असं येचुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 56 लोग दिल्ली की हिंसा में मारे गए। ज़हरीले भाषणों का video है, उन पर कार्यवाई क्यों नहीं हो रही है? क्योंकि सरकार ने आदेश दिया है कि विपक्ष को लपेटा जाए, किसी भी तरह से। यही है मोदी और BJP का असली चेहरा, चरित्र, चाल और चिंतन। विरोध तो होगा इसका। — Sitaram Yechury (@SitaramYechury) September 12, 2020 येचुरी यांनी अनेक ट्विटद्वारे मोदी सरकारवर टीका केली आहे. “दिल्ली पोलीस भाजपाच्या केंद्र सरकार व गृहमंत्रालयाच्या खाली काम करते. त्यांची ही अवैध आणि बेकायदा कृत्यं भाजपाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाचे चरित्र दर्शवत आहे. ते विरोधकांच्या प्रश्नांना आणि शांतीपूर्ण आंदोलनास घाबरतात आणि सत्तेचा दुरुपयोग करून आम्हाला रोखू इच्छित आहेत.” दिल्ली पुलिस भाजपा की केंद्र सरकार और गृह मंत्रालय के नीचे काम करती है। उसकी ये अवैध और ग़ैर-क़ानूनी हरकतें भाजपा के शीर्ष राजनीतिक नेत्रत्व के चरित्र को दर्शाती हैं। वो विपक्ष के सवालों और शांतिपूर्ण प्रदर्शन से डरते हैं, और सत्ता का दुरुपयोग कर हमें रोकना चाहते हैं। — Sitaram Yechury (@SitaramYechury) September 12, 2020 “मोदी सरकारवर निशाणा साधत येचुरी म्हणाले, हे मोदी सरकार केवळ संसदेतील प्रश्नांनाच घाबरत नाही, पत्रकारपरिषद घेण्यासही घाबरते आणि आरटीआयची उत्तर देण्यासही - मग तो मोदींचा वैयक्तिक फंड असेल किंवा पदवी दाखवण्याची बाब, या सरकारच्या सर्व घटनाविरोधी धोरणांचा आणि निर्णयांचा आमच्याकडून विरोध सुरूच राहील.” यह मोदी सरकार न सिर्फ़ संसद में सवालों से डरती है, यह प्रेस कॉन्फ़्रेन्स करने से घबराती है और RTI का जवाब देने से - वो मोदी का निजी Fund हो या अपनी degree दिखाने की बात। इस सरकार की सभी असंवैधानिक नीतियों और असंवैधानिक क़दमों का विरोध जारी रहेगा। — Sitaram Yechury (@SitaramYechury) September 12, 2020 “आमची राज्यघटना आम्हाला केवळ सीएए सारख्या प्रत्येक प्रकारच्या भेदभावाच्या कायद्यांविरोधात शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकारच देत नाहीतर, ही आमची जबाबदारी देखील आहे. आम्ही विरोधकांचे काम सुरूच ठेवणार आहोत. भाजपा सरकारने सुधारावं, आणीबाणीला आम्ही हरवलं होतं, या आपत्कालीन परिस्थितीला देखील सामोरं जाऊ.” असं देखील येचुरी यांनी सांगितलं आहे.