माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी काश्मीर प्रश्नी भाष्य केले आहे. काश्मीरचा मुद्दा वाटतो तितका सोपा नाही. हे छुपे युद्ध आहे. हा एक असा मुद्दा आहे, ज्यासाठी आधीच तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. एका घटनेच्या आधारावर कोणत्याही धोरणाच्या यश-अपयशाचे मूल्यमापन करू नये. ही चकमक होती, जिथे एका अधिकाऱ्यासह ३ जवान शहीद झाले. याचा अर्थ येथील परिस्थिती खराब आहे, असे नाही. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये २००५ ते २०१२ या कालावधीत शांतता होती. २०१२ नंतर अशा घटनांमध्ये वाढीचे कारण काय आहे. याचे तुम्ही विश्लेषण केले आहे का, परिस्थिती का बिघडली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
MoS MEA VK Singh: This very same South Kashmir was very peaceful 2005-2012. What's the reason for the surge in incidents there after 2012. Have you analysed this? Why did this happen? (18.02.2019) https://t.co/S5NFnvk6hF
— ANI (@ANI) February 19, 2019
दगडफेक करणाऱ्यांबाबत सिंह म्हणाले की, काही युवकांना दगडफेक करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. काही युवक वाहनांवर उभे राहून ओरडतात. यातून संपूर्ण काश्मीरच्या युवकांची भावना दिसत नाही. युवक पूर्वीही व्यस्त होते, भविष्यातही असतील. काश्मीरमध्ये भरपूर काम करण्याची गरज असून अनेक कामे केलीही जात आहेत. काहीत यश आले तर काहींमध्ये नाही. यामुद्याकडे सरकार गंभीरपणे पाहत असून त्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जात असल्याने मी सकारात्मक आहे.
MoS MEA: Youth has been engaged earlier also, will be engaged in future also. There are many things required to be done in Kashmir&there are many being done. Some have succeeded, some have not. I'm positive that govt is ensuring that this issue is looked at very seriously.(18.02) https://t.co/HMDZY2hY1O
— ANI (@ANI) February 19, 2019
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2019 10:24 am