आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू नाराज असल्याचे वृत्त पसरल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देण्याची मागणी केली. ‘हुडहुड’ वादळपीडितांना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य प्रलंबित असल्याची चर्चा केली. नायडू यांची अर्थसंकल्पाबाबत नाराजी असल्याचे शहा यांना सांगण्यात आले का, असे विचारले असता सूत्रांनी सांगितले की, नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना यापूर्वीच भावना कळविल्या आहेत.