सध्या संपूर्ण देशात निपाह विषाणूने दहशत निर्माण केली असून केरळमध्ये आतापर्यंत निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याने दहाजणांचा मृत्यू झाला आहे. डुक्कर, वटवाघुळ आणि दूषित फळांमधून हा आजार पसरत असल्याने यापुढे फळे खाताना काळजी घेण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– निपाह विषाणूचा संसर्ग झालेले डुक्कर, प्राणी आणि दूषित फळे खाल्ल्यामुळे हा आजार पसरतो.

– अनेकदा रात्रीच्यावेळी फिरणारी वटवाघुळे झाडाला लागलेली फळे अर्धवट खाऊन सोडून देतात अशी फळे खाल्ल्यामुळे निपाहची लागण होऊ शकते.

– निपाह झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो.

– निपाह विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी झाडावरुन पडलेले कुठलेही फळ खाऊ नये.

– दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिका खंडात निपाह विषाणूचा प्रसार करणाऱ्या वटवाघुळाच्या अनेक प्रजाती आहेत.

– वटवाघुळे अनेकदा केळी, खजूर, आंबा आणि रसदार फळे अर्धवट खाऊन सोडून देतात.

– वटवाघुळे कधीही फणसाच्या झाडावर जात नाही पण आंबे आणि चिक्कू खातात कारण ही फळे नरम असतात. त्यामुळे खाली पडलेले आंबे, चिकू खाऊ नयेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take precautions to avoide nipah virus
First published on: 22-05-2018 at 13:24 IST