‘हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत’, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देण्याची गरज असल्याचे गाझियाबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले.
लव्ह जिहादमागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य आणि ऑर्गनायझरमधून मांडण्यात आला आहे. रांचीमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवचं प्रकरण उजेडात आल्यानंतर आता विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत. हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याविषयी बोलताना भागवत यांनी हे मत व्यक्त केले आहे.
राजकीय फायद्यासाठी लव्ह जिहादच्या मुद्द्याला जाणून-बुजून आरएसएसकडून हवा दिली जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”