तेलंगणा विधानसभेत भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. विधानसभेच्या ११९ जागांपैकी भाजपाला फक्त १ जागा जिंकता आली आहे. टीडीपी आणि काँग्रेसने मिळून २१ जागा मिळवल्या आहेत. तर तेलंगणाच्या जनतेने टीआरएस आणि AIMIM ला ९५ जागांवर विजयी करत त्यांच्या हाती सत्ता दिली आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुका जिंकल्यानंतर ओवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या अहंकाराचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच २०१९ मध्येही आम्ही ताकदीने लढू असेही सांगितले आहे. पत्रकारांनी तुमची व्होट बँक काय असा प्रश्न ओवेसींना विचारला असता सगळा देश माझी व्होट बँक आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.