पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील चुरू येथे पहिल्यांदाच बोलत आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना देश सुरक्षित हातात असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये उच्चारलेल्या त्या कवितेच्या ओळी पुन्हा एकदा म्हणून दाखवल्या. ते म्हणाले, सौगंद है मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दुंगा… मै देश नही रुकने दुंगा… मै देश नही झुकने दुंगा…
PM Narendra Modi in Churu, Rajasthan: Today I repeat what I said back in 2014 – Saugandh mujhe is mitti ki main desh nahi mitne doonga, main desh nahi rukne doonga. Main desh nahi jhukne doonga….Mera vachan hai Bharat maa ko, tera sheesh nahi jhukne doonga… pic.twitter.com/lChHOJm94Z
— ANI (@ANI) February 26, 2019
राजस्थानातील चुरू येथील एका सभेत बोलताना मोदी म्हणाले, मी देशवासियांना विश्वास देतो की, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना माझे शतशः प्रणाम.
PM Narendra Modi in Churu,Rajasthan: Today I assure the countrymen, the country is in safe hands. pic.twitter.com/UDl5z4e91G
— ANI (@ANI) February 26, 2019
मोदी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. मात्र, त्यात राजस्थानमधील एकाही शेतकऱ्याचे नाव नाही. कारण इथल्या काँग्रेस सरकारने याची यादीच केंद्र सरकारकडे पाठवलेली नाही. पुढील दहा वर्षात साडेसात लाख करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना काहीही करायची गरज नाही. त्यांना केवळ पैसे जमा झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर येईल.
PM Narendra Modi in Churu, Rajasthan: Within next 10 years Rs 7.5 Lakh Crore will be deposited in the accounts of farmers. They will not have to do anything for it. They will directly get a notification on their mobile phones, saying that they have received the amount. pic.twitter.com/bBt1Ovd5Dm
— ANI (@ANI) February 26, 2019
१ फेब्रुवारीला या योजनेची घोषणा आम्ही केली होती. त्यावेळी काही लोक म्हणाले होते की हे होऊच शकत नाही. मात्र आता सगळ काही शक्य आहे कारण हे २५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पोहोचला. शेतकऱ्यांचे कल्याण आमची प्राथमिकता आहे. मात्र, त्यावर राजकारण केल्यास दुःख होते. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेतही ५ लाख रुपयांचा इलाज निश्चित केला जात आहे. मात्र, यातही राजस्थानच्या एकाही जणाचे नाव नाही. कारण इथल्या काँग्रेस सरकारने या योजनेशी जोडण्यास गांभीर्य दाखवले नाही, अशा शब्दांत त्यांनी यावेळी काँग्रेसवर टीका केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 2:14 pm