येथील भोट बक्कल भागातील एका भोंदू वैद्याकडून घेतलेल्या औषधाने एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर जिल्ह्य़ातील सहा शहरांत असलेल्या ५६ बोगस वैद्यांच्या दवाखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. मुजफ्फर, झेबुन्निहा आणि सायरीन या तिघांनी वैद्याने दिलेले औषध सेवन केल्यानंतर त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला, असे अझीम नगर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर जिल्ह्य़ातील अनेक भागांत असलेल्या भोंदू वैद्यांच्या दवाखान्यांवर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत असून अनेकांना बजावण्यात आल्या आहेत.