जम्मू आणि काश्मीरमधील बंदिपुरा सेक्टरमध्ये शनिवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पोलिसांना यश आले. या कारवाई दरम्यान त्या दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि युद्धासाठी वापरता येतील अशी काही हत्यारे हस्तगत करण्यात आली. ‘किलो फोर्स’ या भारतीय जवानांच्या तुकडीने ही कारवाई केली. या कारवाईत दोन भारतीय जवान जखमी झाले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याआधी १७ ऑगस्टला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने शोकसागरात देश बुडालेला असताना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आपले डोके वर काढले होते. कुपवाडा आणि बांदिपोरा भागात भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक झाली होती.