लोकसभेनंतर आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. आता यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी होताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. दरम्यान हे विधेयक राज्यसभेत मंजूर होताच पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया देत विधेयकास पाठिंबा दिलेल्या राज्यसभेतील सर्व खासदारांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी म्हटले की, त्यांचे हे पाऊल भारताच्या इतिहासात सदैव स्मरणात ठेवले जाईल. शिवाय, आजचा दिवस ऐतिहासीक असल्याचेही ते म्हणाले. मोदींनी म्हटले आहे की, आज एक ऐतिहासीक दिवस आहे. आज कोट्यवधी मुस्लीम माता-भगिनींचा विजय झाला आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. या ऐतिहासीक क्षणी मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो. तीन तलाक बिल का पास होना महिला सशक्तिकरण की दिशा में एक बहुत बड़ा कदम है। तुष्टिकरण के नाम पर देश की करोड़ों माताओं-बहनों को उनके अधिकार से वंचित रखने का पाप किया गया। मुझे इस बात का गर्व है कि मुस्लिम महिलाओं को उनका हक देने का गौरव हमारी सरकार को प्राप्त हुआ है। — Narendra Modi (@narendramodi) July 30, 2019 तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणे हे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तुष्टिकरणाच्या नावाखाली देशातील कोट्यावधी मात-भगिनींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले गेले आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मुस्लीम महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला. An archaic and medieval practice has finally been confined to the dustbin of history! Parliament abolishes Triple Talaq and corrects a historical wrong done to Muslim women. This is a victory of gender justice and will further equality in society. India rejoices today! — Narendra Modi (@narendramodi) July 30, 2019 राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक ९९ विरूद्ध ८४ च्या फरकाने मंजूर झाले. तिहारी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले.