भगतसिंह यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जनजागृती मंचचे अध्यक्ष कृष्णलाल यांनी तक्रार केली होती. भगतसिंह यांनी ब्रिटिश राजवटीत गुन्हा केल्याने महात्मा गांधी यांनी त्यांची शिक्षा रद्द करावी अशी मागणी केली नव्हती असे तुषार यांनी जयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटल्याचा आरोप आहे.