मालेहून येणारे एअर इंडियाचे विमान त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना त्याचा मागील टायर फुटला, मात्र सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले. एअरबस-३२० जातीचे विमान मालेहून येत होते. त्रिवेंद्रम विमानतळावर विमान उतरत असताना त्याचा मागील टायर फुटला, मात्र त्यामुळे विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे विमानतळाचे प्रभारी संचालक शिबू रॉबर्ट यांनी सांगितले.या घटनेची खबर मिळताच आम्ही आपत्कालीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली. तथापि विमानाचे कोणतेही नुकसान झाल्याचे आढळले नाही आणि त्यामधील सर्व १५२ प्रवासी सुखरूप असल्याचे रॉबर्ट म्हणाले.