पतंजलीचं औषध घेतल्यानंतर करोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसात ठणठणीत झाले असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. करोना या रोगाचा इलाज आर्युर्वेदिक औषधामुळे शक्य आहे. आमचं औषध घेणाऱ्या ७० टक्के लोकांचा करोना हा अवघ्या पाच दिवसांमध्ये बरा झाला. इतकंच नाही तर जे पेशंट करोना पॉझिटिव्ह झाले होते ते आमच्या औषधानंतर निगेटिव्ह झाले असाही दावा बालकृष्ण यांनी केला आहे. #WATCH We appointed a team of scientists after #COVID19 outbreak. Firstly, simulation was done&compounds were identified which can fight the virus. Then, we conducted clinical case study on many positive patients&we've got 100% favourable results: Acharya Balkrishna,CEO Patanjali pic.twitter.com/3kiZB6Nk2o — ANI (@ANI) June 13, 2020 आम्ही औषध शोधल्याचा दावा करतो आहोत तर आमच्याकडे पुरावे मागितले जाणार हे उघड आहे. आम्ही पुढच्या पाच दिवसांमध्ये याबाबतचे सगळे पुरावे देत आहोत असंही बालकृष्णा यांनी सांगितलं. तसंच आम्ही क्लिनिकल ट्रायल्सही करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.