करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. आणखी वाचा- “ना ऑक्सिजन, लस देखील नाही… केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे” Malls, gyms, spas, auditoriums in Delhi to remain closed; cinema halls to operate with 30 per cent capacity: CM Arvind Kejriwal — Press Trust of India (@PTI_News) April 15, 2021 "हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत," असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी लोकांना न घाबरण्याचं आवाहन करताना वीकेण्डला अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहतील असं सांगितलं आहे. तेज़ी से फैलती कोरोना संक्रमण की इस नई लहर और दिल्ली में इसकी वर्तमान स्थिति पर एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस | LIVE — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 15, 2021 आणखी वाचा- देशात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या २ लाखांच्या पुढे; सलग दुसऱ्या दिवशी १ हजाराहून जास्त रुग्णाचा मृत्यू नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी वीकेण्ड कर्फ्यूची घोषणा केली. दिल्लीमध्ये करोना रुग्णांसाठी बेडची कमतरता नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच सार्वजनिक ठिकाणी निर्बंधांची कडक अमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दिल्लीत बुधवारी सर्वाधिक १७ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चाकं दिल्लीसाठी चिंतेची बाब असून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा राज्याला फटका बसला आहे. बुधवारी १०० रुग्णांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर १२.४ वरुन १६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत सध्याच्या घडीला ५० हजार ७३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आधी करोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा उत्तम पर्याय नसल्याचं सांगताना जर आरोग्य व्यवस्था ढासळली तरच तो लावला जाईल असं स्पष्ट केलं आहे.