पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या एका गावात एक मुलगा आणि एका मुलीचं काही पंचांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं. तर या लग्नानंतर या युवकाने आत्महत्या केली आहे. हे पंच तृणमूल काँग्रेसचे काही नेते होते.

या गावातल्या २० वर्षीय माणिक मंडल या युवकाला आपल्या मैत्रिणीसोबत बागेत बसलेलं गावातल्या काही नेत्यांनी पाहिलं. त्यानंतर या नेत्यांनी त्या दोघांना सोबत घेतलं आणि पंचायत भरवली. यावेळी सर्व पंचांनी मिळून ठरवलं की या दोघांचं लग्न लावून देण्यात येईल. या दोघांना शिक्षा म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं होतं.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

रविवारी या पंचांनी या दोघांना एका मंदिरात नेलं आणि लग्न लावून दिलं. लग्नानंतर या दोघांनाही या सर्वांनी माणिकच्या घरी सोडलं. घरी माणिकच्या आईने या लग्नाला मान्यता देण्याचं नाकारलं आणि या घटनेला विरोध केला. यावेळी माणिकचे वडील घरी नव्हते.

गावातल्या कोणीही या दोघांचं काहीही ऐकून घेतलं नाही. त्यांना जबरदस्तीने घरी सोडलं. माणिक आणि त्याच्या आईचे वादही याच कारणामुळे झाले. या वादानंतर माणिकने आत्महत्या केली. ही घटना पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या मानकुट बांध भागात घडली. या गावामध्ये तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे. याच पक्षाच्या नेत्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप यामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.