पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अलीकडेच दुखापत झाली असल्याने त्यांना वेदना होत आहेत, मात्र तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत भाजपच्या ज्या कार्यकत्र्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांची त्यांना जाणीव आहे का, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे केला. ममता यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशा शुभेच्छाही शहा यांनी या वेळी दिल्या.

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असेही शहा यांनी बांकुरा जिल्ह््यातील राणीबंध येथे एका जाहीर सभेत सांगितले.

दीदी तुमच्या पायाला दुखापत झाली, तुम्हाला वेदना होत आहेत, तुमच्या प्रकृतीला लवकर आराम पडो या शुभेच्छा, परंतु तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजपच्या १३० कार्यकत्र्यांची हत्या केली त्यांच्या मातोश्रींच्या वेदनांची तुम्हाला जाणीव आहे का, तुम्ही त्यांच्या वेदना जाणण्याचा कधी प्रयत्न केला का, असा सवाल शहा यांनी केला.

ममता, तुम्हाला त्यांच्या वेदनांची कधीही जाणीव झाली नाही, ते मतदान करताना तुम्हाला सडेतोड उत्तर देतील, असे गृहमंत्री म्हणाले. भाजप सत्तेवर आल्यास आदिवासींच्या हक्कांचे रक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.