भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या टीम इंडियासह भारतीय चाहत्यांना धीर देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, सामन्याचा निकाल जरी निराशाजनक लागला असला तरी, अगदी शेवटापर्यंतची भारतीय संघाची लढाऊ वृत्ती पाहणे चांगले आहे. भारताने संपूर्ण स्पर्धेत फलंदाची, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण चांगले केले, जे अभिमास्पद आहे. जय-पराजय हे जीवनाचे घटक आहेत. भविष्यातील प्रयत्नांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा.