पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला असून १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातामागे नेमकं कारण काय आहे याचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हा अपघात झाला. हे सर्वजण उत्तर २४ परगना येथील बागदा येथून नवद्वीप स्मशानभूमीच्या दिशेने जात होते. यावेळी २० हून अधिक लोक प्रवास करत होते. यादरम्यान हांसखाली येथील फुलबाडी परिसरात गाडी रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. अपघात इतका भीषण होता की, १८ लोकांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुकं असल्यामुळे आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस तपास सुरु आहे.