एकसारखी विचारसरणी असलेले १२ विरोधी पक्ष सोमवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. या समारंभासाठी २१ राजकीय पक्षांना आमंत्रित केलं होतं. परंतु त्यापैकी काही राजकीय पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. यामध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश आहे, अशी माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), विदुथलाई चिरुथायगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा देखील शनिवारी भारत जोडो यात्रेत भाऊ राहुल गांधी
खर्गे यांचं अमित शाहांना पत्र
दरम्यान, सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाने चुका केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. याप्रकरणी काँग्रेस
हे ही वाचा >> “कालपासून जेवलो नाही, भुकेने व्याकुळलोय…”, दुकानातली मिठाई खाण्यापूर्वी चोराने लिहिलं हृदय हेलावणारं पत्र
१४५ दिवसात ३,९७० किमी प्रवास
भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी दक्षिण भारतातून सुरू झाली. ही यात्र तब्बल १४५ दिवसांपासून सुरू आहे. यादरम्यान, राहुल गांधी यांनी १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून ३,९७० किमी पायी प्रवास केला आहे.