पंतप्रधान मोदी यांच्या २०१४ ते २०२० या काळात उच्च क्षमतेचे – उच्च मुल्य असलेले ३५ हजार पेक्षा जास्त उद्योजक हे देशाबाहेर गेले असल्याचा आरोप पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केला आहे. हे सर्व भयगंडातून. काल्पनिक भितीमुळे झालं असावं, एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योजक देशाबाहेर का गेले याबाबत मोदी सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अर्थमंत्री मित्रा यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ ते २०१८ या काळात २३ हजार, २०१९ मध्ये ७ हजार आणि २०२० मध्ये ५ हजार उद्योजक हे देशाबाहेर गेले असल्याचा दावा अमित मित्रा यांनी केला आहे. देशाबाहेर जाणारे उद्योजक हे अनिवासी भारतीय होते. अशा प्रकारचे हे जगातील सर्वात मोठे निर्वासन आहे, यामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोपही मित्रा यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35000 indian entrepreneurs left india under modi government asj
First published on: 21-10-2021 at 18:36 IST