पीटीआय, नवी दिल्ली : ईशान्य भारतासाठी हा ‘ऐतिहासिक दिवस’ असून, शांतता, विकास व समृद्धी यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपलाच लोकांची पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरा, नागालँड व मेघालयचे निकाल जाहीर झाल्यानंतर सांगितले. त्रिपुरात भाजपच्या पुन्हा सत्तेवर येण्याचे वर्णन शहा यांनी ‘विकासोन्मुख राजकारणाचा विजय’ असे केले आणि ‘शांतता व विकास’ यांची निवड केल्याबद्दल त्यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले.
