केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर निशाणा साधत देशाचा पुढील पंतप्रधान मनुष्य हवा, नरभक्षक नको अशी अप्रत्यक्ष टीका वर्मा यांनी मोदींना उद्देशून केली आहे.
‘मोदी भाषणच करत राहतील अन् राहुल गांधी पंतप्रधान होतील’
लखनऊमधील एका संमेलनात ते बोलत होते. वर्मा म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत झालेली देशाची प्रगती आणि या प्रगतीमागील काँग्रेसने दिलेले महत्वपूर्ण योगदान संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे देशाची प्रगती कोणताही खंड न पडता अशीच सुरू राहण्यासाठी काँग्रेस पुन्हा सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यांनी (नरेंद्र मोदी) आतापर्यंत केलेल्या करामती देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहेत. त्यामुळे देशाचा भावी पंतप्रधान मनुष्य हवा, नरभक्षक नको!” असेही वर्मा म्हणाले.
मुझफ्फरनगरचे दंगलखोर गुजरातमधले-वर्मा
या संमेलनादरम्यान, वर्मांनी मोदींचे नाव घेऊन जरी टीका केली नसली, तरी त्यांचा रोष नरेंद्र मोदींवरच असल्याचे संपूर्ण भाषणा दरम्यान जाणवले. तसेच यावेळी काँग्रेसने केलेल्या विकासकामांची स्तुतीसुमने उधळण्यासही वर्मा विसरले नाहीत.
मुलायमसिंह यांचे भाजपशी साटेलोटे
कॉंग्रेस नेत्यांनीच केला उत्तर प्रदेशात पक्षाचा पराभव – बेनी प्रसाद वर्मा
मुलायमसिंग यांच्याकडून अल्पसंख्याकांची फसवणूक