कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते के एस ईश्वरप्पा यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना मोठं विधान केलं आहे. देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन भविष्यात आरएसएससोबत जोडले जातील असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांना तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला आरएसएसला ‘आपली आरएसएस’ म्हणून मान्यता द्यावी लागेल असं म्हटलं. यावर काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर नेते के एस ईश्वरप्पा यांनी हे विधान केलं.

विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा मांडत असताना आरएसएसचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या काही नेते आणि मंत्र्यांसोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख केला. “आपण कोणत्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो यापेक्षा एकमेकांचा आदर करणं जास्त महत्वाचं आहे. आधी आपले वैयक्तिक संबंध येतात आणि नंतर पक्षांमधील मतभेद…भाजपा, आरएसएस, काँग्रेस आणि इतर,” असं सिद्धरमय्या म्हणाले.

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
jalna, lok sabha election 2024, Congress
जालन्यात काँग्रेसचा सावध पवित्रा

यावेळी अध्यक्षांनी सिद्धरमय्या यांना तुम्हाला आरएसएसची भीती का वाटत आहे? असं विचारलं. यावर सिद्धरमय्या उत्तर देत असताना काँग्रेस आमदार जमीर अहमद उभे राहिले आणि आक्षेप घेत अध्यक्षांना विचारलं की, “तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसले असताना ‘आपली आरएसएस’ म्हणत आहात?”

यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “हो नक्कीच ही ‘आपली आरएसएस’ आहे, अजून काय बोलणार? आता किंवा कधीतरी तुम्हाला ही आपली आसएसएस असं म्हणावंच लागणार आहे”. यावर काँग्रेस आमदारांनी तो दिवस येणार नाही असं म्हटलं. महसूल मंत्री आर अशोक यांनी यावेळी उत्तर दिलं की, “तुम्हाला आवडो अथवा नाही…पण सर्व महत्वाच्या पदांवर आरएसएसमधून आलेले आहेत. काँग्रेस आमदार याला देशाचं दुर्देव म्हणतात”.

यानंतर ईश्वरप्पा उभे राहिले आणि म्हणाले की, “या देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन आज किंवा भविष्याक कधी ना कधी आरएसएससोबत जोडले जातील, यामध्ये काही शंका नाही”. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला.