आंध्र प्रदेशातील अमलापूरम शहरात संतप्त आंदोलकांना मंत्र्यांचं घर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने राज्याचे वाहतूक मंत्री पी विश्वरुप यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून दिलं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

याशिवाय जमावाने पोलिसांची गाडी आणि एका शैक्षणिक संस्थेच्या बसलाही आग लावली आहे. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर अमलापूरममध्ये जमावबंदी लावण्यात आली आहे. याशिवाय आसपासच्या जिल्ह्यांमधून ५०० अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत.

Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेवर नाराजी जाहीर केली आहे. आंबेडकरांच्या नावाचा समावेश होत असल्याने अभिमान वाटण्याऐवजी काही समाजविरोधी घटक हिंसाचार घडवत असून वाहनांना आग लावत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“२० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत हे फार दुर्दैवी आहे. आम्ही पूर्ण चौकशी करु आणि दोषी आढळणाऱ्यांना कडक शिक्षा देऊ,” असं त्यांनी सांगितलं आहे. यामागे काही राजकीय पक्ष आणि समाजघातक घटक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

४ एप्रिल रोजी कोनसीमा जिल्हा तयार करण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कोनसीमा साधना समितीने यावर आक्षेप घेतला. मंगळवारी समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलं आणि जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांच्याकडे निवेदन देण्यात आलं. पोलिसांनी आंदोलन थांबवण्याचं प्रयत्न केला असता आंदोलक संतप्त झाले आणि हिंसाचार घडला.