चंदीगड : पंजाबमध्ये २३ मार्चपासून भ्रष्टाचारविरोधात एक हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली. या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येईल. राज्यात भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यात येईल, असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. केजरीवाल म्हणाले, आप सरकारने देशाच्या राजघानीला भ्रष्टाचारमुक्त केले आहे. आता मान आणि त्यांचे मंत्री पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार देतील, असा विश्वास आहे.