भारताने कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कॅनडात भारतविरोधी कारवायांमध्ये तीव्र वाढ झाली असून द्वेष पसरवला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कॅनडातील द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांवर परराष्ट्र मंत्रालयाची करडी नजर आहे.

कॅनडा : गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
Indian youths abroad
नोकरीच्या नावाखाली भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवले, लाओस देशात बेकायदा कॉल सेंटरमध्ये काम करून घेतले
sharad pawar
सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीमुळे देशात विदारक स्थिती; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. “कॅनडामध्ये राहत असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जे लोक प्रवासासाठी अथवा शिक्षणासाठी कॅनडामध्ये जायच्या तयारीत आहेत, त्यांनी योग्य खबरदारी घेत सतर्कता बाळगावी,” असे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.

भारत UNSC चा सदस्य नसण्याचं कारण काय? युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची बैठकीत विचारणा

कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावातील भारतीय मोहिमेत अथवा टोरंटो आणि वॅनक्युवरमधील वाणिज्य दुतावासात नोंदणी करावी, असे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे आणीबाणीच्या काळात भारतीय उच्चायुक्त किंवा दुतावासाला भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे सोयीस्कर होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले वाढले आहेत. मंगळवारी ऑन्टारियोमध्ये झालेल्या गोळीबाळात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सतिवदर सिंग असे या घटनेत मृत झालेल्या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. सतिवदर भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. ‘एम. के. ऑटो रिपेअर्स’ या दुकानात तो अर्धवेळ नोकरी करत होता. सतिवदरच्या मृत्यूनंतर कॅनडातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.