scorecardresearch

Premium

‘काळे झेंडे आणि मोदी परत जा’च्या घोषणा; मोदींविरोधात संताप, #GoBackModi ट्रेंडिंग

मोदी पोहोचण्याआधी ट्विटरवर ‘मोदी परत जा’ म्हणजे #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात

‘काळे झेंडे आणि मोदी परत जा’च्या घोषणा; मोदींविरोधात संताप, #GoBackModi ट्रेंडिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूच्या भेटीवर आहेत. आजपासून चेन्नईत डिफेन्स एक्स्पोला सुरुवात होत असून मोदी या एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. पण येथे पोहोचल्यावर मोदींना कावेरी पाणी प्रश्नावरुन विरोधाचा सामना करावा लागला. सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी मोदी चेन्नई विमानतळावर पोहोचले त्यावेळी ‘मोदी परत जा’ अशा घोषणा देण्यात आल्या, तर काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.  मोदी विमानतळावर पोहोचल्याच्या काही मिनिटांनी लगेचच काळे झेंडे दाखवण्यासाठी वाट पाहणारे राजकीय कार्यकर्ते, नेते तसंच अभिनेते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चेन्नई विमानतळाजवळ अलांदूर येथे आंदोलनकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून निषेध केला. newindianexpress.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.

त्यापूर्वी मोदी तामिळनाडूत पोहोचण्याआधीपासून ट्विटरवर ‘मोदी परत जा’ म्हणजे #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगचा वापर करुन अनेकांनी ‘इथं येऊन खोटे अश्रू ढाळू नका’, ‘तामिळनाडूतील जनतेला मूर्ख बनवू नका’ , ‘हे तामिळनाडू आहे, गुजरात नाही, हे लक्षात असू द्या,’ अशा प्रकारच्या भावना अनेकांनी ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

का होतोय विरोध –
तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कावेरीच्या पाणी वाटपावरुन वाद सुरू आहे. कावेरी प्रश्नावरुन तामिळनाडूच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी केली असून तामिळनाडूच्या वाट्यातील पाणी कमी केलं आणि कर्नाटकचा वाटा वाढवला आहे. याशिवाय कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ गठीत झालेलं नाही. या मुद्द्यांवरुन तामिळनाडूत आंदोलन सुरु आहे. कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक असल्याची तामिळनाडूतील जनतेची भावना आहे. या प्रकरणात मोदी सरकारनं तामिळनाडूची बाजू योग्यपणे मांडली नाही, अशी येथील लोकांची भावना आहे. त्यामुळे राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-04-2018 at 12:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×