तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) ६ विधानपरिषदेच्या आमदारांनी गुरुवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत बीआरएसच्या या सहा आमदारांनी पक्षप्रवेश केला आहे. गेल्या वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर के.चंद्रशेखर राव यांना धक्यावर धक्के बसत आहेत. आता बीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये दंडे विठ्ठल, भानू प्रसाद राव, एमएस प्रभाकर, बसवाराजू सरैया, बोग्गारापू दयानाद आणि येगे मल्लेशम यांचा समावेश आहे. या आमदारांच्या काँग्रेसमधील पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसच्या प्रभारी दीपा दास मुंशी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

हेही वाचा : राहुल गांधी हाथरस चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांच्या भेटीला, सांत्वन करत दिलं मदतीचं आश्वासन

दरम्यान, तेलंगणा विधानपरिषदेत बीआरएसचे २५ सदस्य आहेत. मात्र, बीआरएसच्या विधानपरिषदेतील ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या चारवरून आता दहावर पोहचली आहे. माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचे विश्वासू समजले जाणारे केशव राव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

केशव राव हे राज्यसभेवर खासदार होते. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केशव राव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्ली दौऱ्यावरून तेलंगणात दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्री बीआरएसच्या सहा आमदारांनी मध्यरात्रीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

के.चंद्रशेखर राव हे दोन पंचवार्षिक सत्तेत राहिले. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव झाला. बीआरएसला ११९ पैकी फक्त ३९ जागा मिळाल्या होत्या. त्यामधूनही निवडणुकीनंतर काही आमदारांनी बीआरएससोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. यानंतर आता विधानपरिषदेतील सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे बीआरएस पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader