सत्ताधारी भाजपावर देशात धार्मिक धृवीकरण केल्याचा आरोप वारंवार होतो. यावरून विरोधकांनी अनेकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, अशातच ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील धार्मिक धृवीकरणावर मोठं विधान केलं आहे. देशात कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण होत नाही, असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ते शुक्रवारी (२ जून) इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “माझ्यामते कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण होत नाहीये. कारण धार्मिक धृवीकरण होण्यासाठी समान ताकदीच्या दोन बाजू असाव्या लागतात. सध्या या दोन बाजूच अस्तित्वात नाहीत. वास्तवात भाजपा बहुसंख्यांकवादाचा वापर करून द्वेषाचं राजकारण करत आहे. त्यामुळेच मी धार्मिक धृवीकरण होत नसल्याचं म्हणत आहे.”

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

“भाजपाने कधीनव्हे एवढं मुस्लिसांचं खच्चीकरण केलं”

“भाजपाने कधीनव्हे एवढं मुस्लिसांचं खच्चीकरण केलं आहे. मी असं का म्हणत आहे हे सांगताना मी एक उदाहरण देईन. भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आम्ही तेलंगणातील नव्या सचिवालयाचे घुमट पाडून टाकू, कारण ते मुस्लीम घुमट आहेत. दुसरीकडे अमित शाह तेलंगणात येतात आणि ४ टक्के आरक्षण रद्द करू अशी घोषणा करतात,” असा आरोप असुद्दीन ओवैसी यांनी केला.

“भाजपाने हिंदुत्वाचा अजेंडा राबवला”

ओवैसी पुढे म्हणाले, “अशापरिस्थितीत दुसरी बाजू कुठे आहे? त्यामुळे वास्तवात अशाप्रकारचं कोणतंही धार्मिक धृवीकरण नाही. भाजपाकडून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे. त्यातून त्यांना निवडणुकीत फायदा होत आहे.”

हेही वाचा : Video : “विनेश तू तर माझ्या कुटुंबातीलच…”, काँग्रेसने शेअर केला पंतप्रधानांचा ‘तो’ जुना व्हिडीओ

“भीती वाटल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसला मुस्लीम मतं”

“मुस्लिमांनी कथित सेक्युलर पक्षांना मत देण्याचा पॅटर्न कायम राहिला आहे. मोदींना हिंदू धर्मातील अनेक जातींमधून मतांचा टक्का वाढत आहे, मात्र २०१४ असो की २०१९ असो मुस्लीम समाजाच्या वाटा ६ टक्केच आहे. कर्नाटक निवडणुकीत आशा आहे म्हणून नाही तर भीती आहे म्हणून मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केलं,” असा दावा ओवैसी यांनी केला.

Story img Loader