जालंधर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

पंजाबमध्ये भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
pm narendra modi manipur
“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान
Prime Minister criticism of the campaign rally in Rajasthan to stop the action of corrupt people
भ्रष्ट लोकांची कारवाई थांबवण्यासाठी एकजूट; राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधानांची टीका

सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे पंतप्रधानांना ५ जानेवारीचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. फिरोजपूर येथे निदर्शकांनी रस्ता रोखून धरल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रथमच पंतप्रधान पंजाब दौऱ्यावर गेले होते.

    नवा पंजाब घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, हे राज्य कर्जमुक्त असेल तसेच प्रत्येकाला संधी उपलब्ध होतील तसेच दलितांचा सन्मान राखला जाईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भ्रष्टाचाराला तेथे कोणताही थारा नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या धोरणांमुळे राज्यातील उद्योगधंद्यांचे नुकसान झाले असून, भाजप्रणीत आघाडीकडे नवा पंजाब घडविण्याची दृष्टी आहे. पंजाबमध्ये काँग्रेस कधीही काम करू शकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जे पक्षातच एकमेकांविरोधात संघर्ष करतात ते स्थिर सरकार कसे देतील? असा सवाल त्यांनी काँग्रेसमधील गटबाजीवर केला.

  काही लोक येथे येऊन खोटी आश्वासने देतात, अशा शब्दांत त्यांनी आम आदमी पक्षावर टीका केली. पंजाबला अमली पदार्थापासून मुक्त करू, असे आश्वासन देतात, मात्र रस्त्यावर मद्याची दुकाने थाटण्यात ते तज्ज्ञ आहेत, असा टोला त्यांनी ‘आप’ला लगावला.

‘देवी तलाव मंदिर दर्शनाची इच्छा    पंजाब प्रशासनामुळे अपूर्ण’

जालंघर येथील सभेत त्यांनी राज्यातील सत्तारूढ काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले. पंजाब दौऱ्यात देवी तलाब मंदिरात दर्शनाला जाण्याची इच्छा होती. मात्र प्रशासनाने याबाबत तयारी केली नाही, अशी नाराजी व्यक्त करत, पंजाबमधील काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडले. पुन्हा जालंधर येऊन दर्शन घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.