मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा खासदार उषा ठाकूर यांनी गरबा कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देण्याबाबत मोठं विधान केलं आहे. गरबा कार्यक्रमाला यायचं असेल तर स्वत:चे ओळखपत्र सोबत आणा, अन्यथा गरबा कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही. गरबा कार्यक्रम हे लव्ह जिहादचे मोठे केंद्र बनले होते, त्यामुळे हा निर्णय घेणं गरजेचं होतं. ज्यांना मूर्तीपूजक व्हायचं आहे, असे मुस्लीम आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन येऊ शकतात, असं विधान उषा ठाकूर यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या उषा ठाकूर?
गरबा कार्यक्रमात यायचं असेल, तर सोबत ओळखपत्र आणावं, असे उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. मुस्लिमांना मूर्तिपूजक व्हायचे असेल, तरच गरब्याच्या कार्यक्रमाला या. गरबा कार्यक्रम हा मनोरंजनासाठी नाही. कुणीही आपली ओळख लपवून कार्यक्रमाला येऊ नये. मुस्लिमांनी गरबा कार्यक्रमाला एकटं येऊ नये, त्यांनी आपली आई, मुलगी किंवा बहिणीला सोबत आणावे.

हेही वाचा- निर्मला सितारामन यांनी भारतीय उद्योग जगताची तुलना हनुमानाशी केली, नेमकं काय म्हणाल्या?

गरब्याला येणाऱ्यांनी ओळखपत्र आणणं आवश्यक
आता गरबा आयोजक सतर्क झाले आहेत. त्यामुळे गरब्याला येणाऱ्यांना ओळखपत्र आणावे लागणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. हा सर्वांसाठी सल्ला आहे. सध्या देशात लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू आहे. गरबा हे लव्ह जिहादचे केंद्र बनत आहेत. केवळ मनोरंजनासाठी गरबा कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही. ज्या मुस्लिमांना मूर्तीपूजक व्हायचे आहे, त्यांनी आपल्या कुटुंबासह गरबा कार्यक्रमाला यावं, असं उषा ठाकूर म्हणाल्या.