scorecardresearch

‘मोदींच्या धोरणांमुळेच राहुल-प्रियंका गांधी बर्फवृष्टीचा आनंद लुटू शकले,’ भाजपा नेत्याचे विधान

कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची ३० जानेवारी रोजी सांगता झाली.

RAHUL GANDHI AND PRIYANKA GANDHI AND NARENDRA MODI
राहुल गांधी, प्रियंका गांधी, नरेंद्र मोदी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची ३० जानेवारी रोजी सांगता झाली. या यात्रेचे नेतृत्व खासदार राहुल गांधी यांनी केले. आपल्या या यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. तसेच या यात्रेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी सहभाग नोंदवला. यात्रा सुरू असताना राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यातील बहीण-भावांच्या नात्याचा वेगळा पैलू दिसला. काश्मीरमध्ये असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बर्फवृष्टींचा आनंद लुटताना दिसले. यावरच आता भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी विधान केले आहे. मोदी यांच्या धोरणांमुळे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटू शकले, असे तरुण चुग म्हणाले.

हेही वाचा >>> विकासाचा वेग संथच! आर्थिक पाहणी अहवाल : पुढील वर्षी ‘जीडीपी’ ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंत

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाप्रती झिरो टोलरन्स धोरणामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकले,” असे तरुण चुग म्हणाले.

“राहुल गांधी कोणत्याही परवानगीशिवाय काश्मीरमध्ये जाऊ शकले. तसेच कोणत्याही अडथळ्याशिवाय ते लाल चौक परिसरात तिरंगा फडकवू शकले. त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानायला हवेत,” असेही तरुण चुग म्हणाले.

हेही वाचा >>> PM CARES फंडवर सरकारची मालकी नाही, मोदी सरकारची न्यायालयात माहिती

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची ३० जानेवारी रोजी सांगता झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांनी एकूण ४०८० किलोमीटरपर्यंत पायी प्रवास केला. ही यात्रा एकूण ७५ जिल्हे आणि १२ राज्यांतून गेली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 08:06 IST
ताज्या बातम्या