सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱया कुरापती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत असताना दुसरीकडे मात्र सीमेवर पाककडून अजूनही गोळीबार सुरूच आहे.
गेल्या २४ तासांत पाकिस्तानकडून झालेल्या गोळाबारात ६ भारतीय नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुँछ जिल्ह्यात बालाकोट सेक्टर येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्यामुळे २३ ऑगस्ट रोजी होणारी दोन्ही देशांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.