पीटीआय, लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : लखीमपूर खेरी येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये आंदोलक शेतकऱ्यांना मोटारीची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि इतर १२ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले. खून, गुन्हेगारी कट, नासधूस व संबंधित गुन्ह्यांप्रकरणी हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आशिष मिश्रा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. चार शेतकरी आणि पत्रकाराच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणी १४ आरोपींवर खटला चालवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुनील कुमार वर्मा यांनी पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे, असे फौजदारी सरकारी वकील अरविंद त्रिपाठी यांनी सांगितले. त्रिपाठी म्हणाले, की आशिष मिश्रासह १३ आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या कलम १४७ आणि १४८ (दंगल), १४९ (बेकायदेशीर सभा), ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२६ (धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे) , ४२७ (दुर्घटना) आणि १२० ब (गुन्हेगारी कटासाठी शिक्षा), व मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charges 13 people including ashish mishra next hearing lakhimpur kheri violence case december 16 ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST