तामिळनाडूत सुनामी दुर्घटनेला आज अकरा वर्षे पूर्ण झाली असून, ठिकठिकाणी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व शांती फेऱ्या काढण्यात आल्या. यात सात हजार लोक मरण पावले होते. चेन्नई, कडलोर, पुदुच्चेरी व नागपट्टीनम येथे या सुनामीचा फटका बसला होता. त्या वेळी इंडोनेशियात सुमात्रा बेटांवर भूकंप झाला होता, त्यामुळे सुनामी लाटा उसळून त्या श्रीलंका व तामिळनाडूमध्ये पोहोचल्या होत्या. या घातक लाटांनी अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेच्या कटू स्मृती अजूनही ताज्या आहेत. येथील मच्छीमार संघटनांनी प्रार्थना व स्मृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मरिना बीच येथे काही कुटुंबांनी सागरात दूध अर्पण केले. चेन्नईतील मच्छीमार आज मच्छीमारीसाठी सागरात गेले नव्हते. नागपट्टीनम जिल्हय़ात सहा हजार लोकांनी प्राण गमावले होते, तेथे एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मच्छीमार व्यवसाय मंत्री के. ए. जयपाल व जिल्हाधिकारी एस. पझानिसामी तसेच इतर अधिकाऱ्यांनी मेणबत्ती फेरी काढून पुष्पांजली वाहिली. वैलानकण्णी येथील बॅसिलिकामध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?
Yavatmal Washim Lok Sabha
यवतमाळ – वाशिममधील उद्धव ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा ?
opposition are Anti-Hindus so how much did wages of Hindu farm laborers increase in Gujarat vijay Javandhia
“विरोधक हिंदू विरोधी, मग गुजरातमध्ये हिंदू शेतमजुरांची मजुरी किती वाढवली?” जावंधिया यांचा सवाल